आतापर्यंतचा मीडिया हा एक ते अनेक असा होता, आहे. मात्र, ब्लॉग हाच असा एकमेव मीडिया आहे जो एकाचवेळी सर्वांचा सर्वांसाठी अशा स्वरूपाचा आहे. यामुळे माध्यमाच्या मालकीमुळे येणारा माध्यमाच्या प्राप्तीचा अडसर दूर झाला आहे.
विशेषत: यात दृक्-श्राव्य आणि लिखित अशा सर्व प्रकारांतील कंटेंट प्रकट करता येत असल्याने, या तीन्ही प्रकारांतील माध्यमांची शक्ती ब्लॉगने आपल्याला देऊ केलीये. त्या अर्थाने प्रस्थापित आणि पारंपरिक माध्यमांना पर्याय उभे करणारे ब्लॉग हे विद्रोही माध्यम आहे, असे मला वाटते.
आता कोणालाही आपल्या मतासाठी
वृत्तपत्रांवर पूर्ण विसंबून राहण्याची गरज नाही...
आता कोणासही आपले म्हणणे ऐकवण्यासाठी रेडिओवर स्पेस विकत घेण्याची गरज नाही...
आता चॅनल्सच्या ऐवजी तुम्हीच
दाखवा, काय दाखवायचंय ते...
या माध्यमाच्याही मर्यादा आहेत.
पण, प्रस्थापित माध्यमापेक्षा यात
असणारा वाव महत्वाचा.
मला ब्लॉग हे मराठी भाषेच्या जतन व संवर्धनाचे प्रभावी माध्यम वाटते. ब्लॉगमुळे
मराठी साहित्य जगभरात सहज पोहोचेल.
ग्रामीण, उपेक्षितांच्या अभिव्यक्तीला कुठल्याही
मध्यस्थाची गरज भासणार नाही.
या क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. आम्ही काही मंडळी यात काही, काही करत आहोत.
तुम्ही किमान एक करा....
स्वत:चा ब्लॉग सुरू करा. त्यात लिहा,
चित्र दाखवा, ऑडिओ क्लिप ऐकवा, व्हिडिओ दाखवा. काहीही करा. पण करा.
कुणी उत्तमोत्तम साहित्य मराठीतून ब्लॉगवर आणावं, कुणी चांगल्या फोटोंचं कलेक्शन द्यावं, कुणी जंगल, प्राणी वाचवण्याची मोहिम हाती घ्यावी हे अन् असं काहीही करा पण करा.
Tuesday, March 3, 2009
Monday, March 2, 2009
वंदन गुरूपरंपरेला...
मनुष्याला गुरू करणार नाही, अशी प्रतिज्ञा करून याज्ञवल्क्य ऋषींनी शिकलेले वेद वमनाद्वारे
अनलर्न्ड केले. यानंतर त्यांनी सूर्याला गुरू करून, त्याच्याकडून साक्षात परब्रह्माने जे वेद सूर्याकडे सुरक्षित ठेवले होते ते शिकून घेतले. यात सूर्य म्हणजे कोण, वमनाद्वारे शिकलेली गोष्ट बाहेर कशी टाकली हे मला कळले नसले, तरी गुरूचं महत्व मोठंए. खरं गुरूत्व-गुरूतत्व म्हणजे ते महान अनास्तित्व होय, ज्याच्या प्राप्तीसाठी हा अब्जावधी वर्षांचा ज्ञानयाग सुरू झालाय. सभोवतालातून मानवी अस्तित्वात, आणि त्याच्या अस्तित्वातून डीएनएद्वारे हजारोवर्ष आणि हजारो वर्षांचा ज्ञानाचा वसा आपल्यापर्यंत येतोच आहे...पुढे जातोच आहे. हीच ती खरी गुरू परंपरा. खरं ज्ञान जगाच्या शाळेत मिळतं म्हणतात. सर्वत्र असणारं सर्व काही या शाळेची शिक्षक आहे. या गुरूपरंपरेला मी वंदन करतो. जगताना, जाणीव-नेणीवेच्या पातळीवर समजलेलं, कळलेलं, माहित झालेलं, दिसेलेलं, ऐकलेलं, स्पर्शिलेलं, चव घेतलेलं, आणि मुळात अनुभवलेलं असं जाहीर करण्यासाठी हा जाहिरनामा.....
अनलर्न्ड केले. यानंतर त्यांनी सूर्याला गुरू करून, त्याच्याकडून साक्षात परब्रह्माने जे वेद सूर्याकडे सुरक्षित ठेवले होते ते शिकून घेतले. यात सूर्य म्हणजे कोण, वमनाद्वारे शिकलेली गोष्ट बाहेर कशी टाकली हे मला कळले नसले, तरी गुरूचं महत्व मोठंए. खरं गुरूत्व-गुरूतत्व म्हणजे ते महान अनास्तित्व होय, ज्याच्या प्राप्तीसाठी हा अब्जावधी वर्षांचा ज्ञानयाग सुरू झालाय. सभोवतालातून मानवी अस्तित्वात, आणि त्याच्या अस्तित्वातून डीएनएद्वारे हजारोवर्ष आणि हजारो वर्षांचा ज्ञानाचा वसा आपल्यापर्यंत येतोच आहे...पुढे जातोच आहे. हीच ती खरी गुरू परंपरा. खरं ज्ञान जगाच्या शाळेत मिळतं म्हणतात. सर्वत्र असणारं सर्व काही या शाळेची शिक्षक आहे. या गुरूपरंपरेला मी वंदन करतो. जगताना, जाणीव-नेणीवेच्या पातळीवर समजलेलं, कळलेलं, माहित झालेलं, दिसेलेलं, ऐकलेलं, स्पर्शिलेलं, चव घेतलेलं, आणि मुळात अनुभवलेलं असं जाहीर करण्यासाठी हा जाहिरनामा.....
Subscribe to:
Posts (Atom)